Your cart is currently empty!
पिंगुळीच्या अंगणात…
लोकसाहित्य हे प्रवाही साहित्य असून समाजातील एखाद्या सृजनशील मनाकडून त्याची निर्मिती होते आणि ते लोकांचे होऊन जाते. वटवृक्षाला पारंब्या फुटाव्यात आणि त्यातून तो वृक्ष विस्तारत जावा तसे लोकसाहित्याच्या बाबतीत घडताना दिसते. हे सर्व होत असताना स्थल, कालपरत्वे त्यात बदल होत जातात. मात्र त्याचा मूळ गाभा कायम राहातो. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींच्या कलाही त्याला अपवाद नाहीत. पिंगुळीच्या अंगणात ठाकरांच्या अनेक कला शेकडो वर्षे नांदत आहेत. अनेक पिढ्यांनी मौखिक परंपरेने या कलांची जोपासना केली. काहींनी त्यात आणखी लोककलांची भर घातली तर काहींनी त्याला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला. जुन्या नव्याची सुंदर वीण घालून त्यांना एकजीव करून ठेवण्याचे कार्य ठाकर आदिवासींनी निःस्पृहपणे केले आहे.…
Description
लोकसाहित्य हे प्रवाही साहित्य असून समाजातील एखाद्या सृजनशील मनाकडून त्याची निर्मिती होते आणि ते लोकांचे होऊन जाते. वटवृक्षाला पारंब्या फुटाव्यात आणि त्यातून तो वृक्ष विस्तारत जावा तसे लोकसाहित्याच्या बाबतीत घडताना दिसते. हे सर्व होत असताना स्थल, कालपरत्वे त्यात बदल होत जातात. मात्र त्याचा मूळ गाभा कायम राहातो. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींच्या कलाही त्याला अपवाद नाहीत. पिंगुळीच्या अंगणात ठाकरांच्या अनेक कला शेकडो वर्षे नांदत आहेत. अनेक पिढ्यांनी मौखिक परंपरेने या कलांची जोपासना केली. काहींनी त्यात आणखी लोककलांची भर घातली तर काहींनी त्याला नवे रूप देण्याचा प्रयत्न केला. जुन्या नव्याची सुंदर वीण घालून त्यांना एकजीव करून ठेवण्याचे कार्य ठाकर आदिवासींनी निःस्पृहपणे केले आहे. या साऱ्याची एक कृतज्ञ नोंद म्हणून ‘पिंगुळीच्या अंगणात…’ ही कृती वाचकांना समाधान देऊन जाईल.
Vendor Information
- Address:
- No ratings found yet!












Reviews
There are no reviews yet.